गाव : राजहंसगड/येळ्ळूर, तालुका/जिल्हा बेळगाव, समुद्रसपाटीपासून उंची 942 मीटर, प्रकार : गिरिदुर्ग.
आपल्या मराठी बेळगाव पासून अवघ्या ६ किमी वर आहे राजहंसगड म्हणजेच येळ्ळूर गड हिरव्यागार भातशेतीने भरलेला परिसरमध्ये, अगोदर राजहंसगड गाव किल्ल्यावर होते परंतु आता ते खाली स्थानांतर झाले आहे.
या किल्ल्यावर अनेक राजवटीने राज्य केले प्रामुख्याने यादवस, होयसलास, बहामनी, आदिशशी, मराठे पेशवा.
रस्ता चांगला बनवला आहे त्याने गाडी गडावर जाते.
हा किल्ला उंच असल्याने त्याचा उंचीचा उपयोग शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी बेळगाव पासून बाहेर म्हणून टेहळणीसाठी वापरला जायचं.
राजहंसगडाने ३ मोठ्या लढाया मध्ये भाग घेतला, १) पेशवा विरुद्ध सरनूरचे नवाब २)पेशवा विरुद्ध टिपू सुलतान फौज ३) राजहंसगड फौज विरुद्ध भीमगड फौज.
लढाई काळात अन्न, पाणी, बंदूक, दारुगोळा, हत्यार पुरवण्यासाठी बेळगाव किल्ला ते राजहंसगड असा भुयारी मार्ग होता
ब्रिटिश काळात या किल्ल्यावर १०० सैनिक संरक्षणासाठी ठेवले जायचे.
किल्लाच डोंगर हा ५ थरामध्ये आहे म्हणून प्रत्येक चढाई मध्ये आपल्याला किल्ल्याचे वेगवेगळे रूप दिसून येत.
किल्ल्याच्या प्रवेशद्वाराला अप्रतिम मराठेशाही बुरुज, सुस्थितीत गोमुख दरवाजा आहे.
पायर्यांनी वर आलो कि लगेच समोर शिवाचे सिद्धेश्वर मंदिर लागते,
किल्ल्याला पूर्ण तटबंदीवरुन फिरत येत.
फक्त दक्षिण तटबंदी ढासळून गेलीय नाहीतर आजही लढाई साठी तयार असा गिरिदुर्ग आहे.
खखणीत 5 बुरुज, प्रेक्षणीय तटबंदी,1 बांधीव गोड पाण्याची विहीर,1 हौद, सिद्धेश्वर मंदिर अप्रतिम दुर्ग आहे, 1 एकर मध्ये असावा.
No comments:
Post a Comment